?देसाईगंज:- २8 मार्च २०२३ मंगळवार ला दुपारी १ वाजता, आम आदमी पार्टी देसाईगंज उपजिल्हा अध्य्क्ष प्रकाश भाऊ जीवानी यांच्या नेतृत्वात व्विद्युत महावितरण कार्यालय देसाईगंज येथे आंदोलन करण्यात आले आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य द्वारे राज्यव्यापी वीज दरवाढ . सर्वसामान्य माणसाला लुटण्याचा कसा डाव शासनाने आखला आहेl
राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार महावितरणने 2023-24 आणि 24-25 साठी प्रस्तावित वीज दरवाढ केली आहे. ही दरवाढ पहिल्या वर्षी 11 आणि दुसऱ्या वर्षी 14 टक्के असेल, असा दावा महावितरणातर्फे करण्यात येतो आहे. मात्र प्रत्यक्षात ही दरवाढ 27 ते 37 टक्के होणार आहे.

प्रति युनिट दोन रुपये 75 पैसे वीज दरवाढ होईल. यासंदर्भात नागरिकांनी आवाज उठवायला हवा. यंदा जो सरासरी दर आयोगाने मंजूर केलेला आहे, त्यामध्ये इंधन समायोजन आकारांचा समावेश केलेला आहे. मार्च 2020 ला जे आदेश दिले आहेत, त्या आदेशानुसार यावर्षीचा सरासरी देयक दर हा सात रुपये सत्तावीस पैसे आहे. प्रत्यक्षात महावितरण कंपनीने मात्र हा सरासरी देयक दर हा 7 रुपये 79 पैसे अशा पद्धतीने नमूद केलेला आहे. आत्ताचा दर 7 रुपये 79 पैसे तर 23- 24 वर्षासाठी 8 रूपये 90 पैसे आहे. फरक वाढ 14 टक्के आहे. त्याच्यापुढे 24-25 वर्षासाठी 92 म्हणजे फरकवाढ अकरा टक्के आहे. मात्र हे ही गणित चुकीचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. कारण 7 रूपये 79 पैसे जरी मान्य केले तरी तो आठ रूपये नव्वद पैसे होतो. पुढच्या वर्षी ही वाढ सव्वा चौदा टक्के आहे. 14.25 नंतरची जी वाढ आहे, ती वाढ अकरा टक्के येत नाही तर ती जास्त येते. एकूण वाढ ही 27.34 टक्के इतकी होते.
इंधन समायोजन पद्धत: 2018 पर्यंत आयोगाने जे काही आदेश दिले, त्या आदेशामध्ये इंधन समायोजन पद्धतीने समावेश केला जात नव्हता. केव्हाही तुलना ही एका समपातळीवर केली पाहिजे. म्हणजे मार्च 2020 च्या आदेशानुसार झालेले दर आणि आता एमईआरसीच्या आदेशानुसार होणारे यांचे तुलना झाली पाहिजे. एप्रिल 2023 मध्ये यांची तुलना झाली पाहिजे. पण प्रत्यक्षात पहिले दोन वर्ष अजिबात नव्हता आणि तिसऱ्या
वर्षी गेल्या वर्षी सुरुवातीला एप्रिलमध्ये पंधरा वीस पैसे झाला. जूननंतर तो एक रुपये तीस पैसे झाला हे लक्षात घेतले पाहिजे. इंधन समायोजन लागणार नाही, असे ते सांगतात. मागचाही एबीआर आणि आत्ताचा एबीआर या पद्धतीने केला पाहिजे. महावितरण कंपनीला दिलेल्या वाढ ती 67 हजार 644 कोटी रुपये इतकी तुटीची भरपाई आहे. 19 -20 पासून ते 24 -25 पर्यंत या सहा वर्षासाठी आहे. ह्या तुटीची भरपाई आपल्याला दोन वर्षांमध्ये करायची आहे.
पावणेतीन रूपये प्रति युनिट दरवाढ: त्यामुळे कंपनीने काही जरी सांगितले तरी प्रत्यक्षामध्ये ग्राहकाला लागणारा फटका हा सरासरी दोन रुपये पंचावन्न पैसे आहे. ती आकडेवारी जर ग्राहकांनी वाचली की, कळेल वीज आकारांमध्ये वाढ होत आहे. आमच्या हिशोबाने ती 50 टक्के 55 टक्के या दरम्यान होते. आपल्याला दोन रुपये 55 पैसे प्रति युनिट वीज दरवाढ आहे. प्रत्यक्षात ती आणखी पुढे जाऊन पावणे तीन रुपये प्रति युनिट होते आहे.
ही माहिती राज्यातील प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आम जनतेच्या हितार्थ आज निषेध करण्यात आले व महावितरण कार्यलय देसाईगंज चे कार्यकारी अभियंता यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व उप मुख्यमंत्री तसेच ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना विज दर कमी करून शिवसेनाच्या जाहिरनामा प्रमाने सत्तेत आल्यास ३०० यूनिट मोफत देण्याच्या आश्वसनाचें आठवण करवित निवेदन देण्यात आले ll या वेळी तालुका संयोजक भरत दयलानी, शहर संयोजक आशीष घुटके सलाहाकार दीपक नागदेवे, तबरेज खान, नाजुक लुटे, अतुल ठाकरे, प्रमोद दहिवले,चंदू ठाकरे, विपुल गनवीर,सिद्धारथ,पवन, गनवीर,आशीष कोवे, केवलराम सयाम,वामन पगारे, रितेश देशमुख, पवन खोब्रागडे,अनिकेत बावने,राहुल बावने,फारूक पटेल, टिकेश कम्बरी, संदीप पत्रे,सागर मेश्राम, देवा खोब्रागडे,शिल्पा बोरकर,मनीषा टेटे, आंचल खोब्रागडे, प्रगति शेंडे, संगीता बागरे,पुष्प,हेमलता शिरबम ,व मोठ्या संख्येने महिला व तालुक्यतिल गावकारी या निषेधात शामिल होते

