Thursday, March 27, 2025
Homeदेसाईगंजखऱ्या आदिवासींवर अन्याय होऊ नये म्हणून उमेदवारीतून माघार* माधुरी मडावी यांची पत्रपरिषदेत...

खऱ्या आदिवासींवर अन्याय होऊ नये म्हणून उमेदवारीतून माघार* माधुरी मडावी यांची पत्रपरिषदेत माहिती,

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

✍️ देसाईगंज: अनुसुचित जाती करीता राखीव असलेल्या ६७ आरमोरी विधानसभा क्षेत्रात खऱ्या आदिवासींवर अन्याय होऊ नये म्हणून आरमोरी विधानसभा निवडणूकीतून माघार घेत असल्याची माहिती माधुरी मडावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

          पत्रपरिषदेत माहिती देतांना माधुरी मडावी पुढे म्हणाल्या की, ६७-आरमोरी विधानसभा क्षेत्रासोबत गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्र, चिमुर-गडचिरोली लोकसभा क्षेत्र हे अनुसुचित जाती (आदिवासी) समाजाकरीता राखीव आहे. ह्या विधानसभा क्षेत्रात प्रतिनिधीत्व करणारा उमेद‌वारी हा खरा व अस्सल आदिवासी

असायला पाहिजे. परंतु भारतीय जनता पक्षाचे

उमेदवार असलेले व गेल्या १० वर्षापासून आरमोरी विधानसभेचा प्रतिनिधीत्व करीत असलेले कृष्णा गजबे हे बोगस आदिवासी म्हणजेच माना जमातीचे आहेत. त्यांच्या कडे असलेले प्रमाणपत्र हे घटनाबाह्य आहेत. असे असतांनाही ते गेल्या दोन दशकांपासून अनु. जमातींचे घटनात्मक सवलतींचा लाभ घेत आहेत. क्रिष्णा गजबे व इतर माना जात समुहास निर्गमित करण्यात आलेले जात प्रमाणपत्र हेच असंविधानिक असल्याने त्यांच्या त्या जात प्रमाणपत्रांवर मी स्वतः आरमोरी विधानसभा क्षेत्राची उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल करतांनाच दि. २९ ऑक्टोंबर २०१४ ला संपूर्ण पुराव्यानिशी मा. निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (राजस्व) यांच्या कडे आक्षेप नोंदविला होता. बोगस आदिवासी असलेले गजबे यांचे घटनाबाह्य जात प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केल्याने मला खऱ्या आदिवासी उमेदवारांवर अन्याय होऊ नये म्हणून मी ६७-आरमारी विधानसभा क्षेत्राच्या निवडणूकीत माघार घेत असल्याची माहिती माजी उपायुक्त माधुरी मडावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

विकासकामांना पूर्ण वेगाने पूढे न्या – मुख्य सचिव सुजाता सौनिक दोन आठवड्याच्यावर विकासकामे प्रलंबित ठेवू नये शासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा

✍️गडचिरोली दि. 22: राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज गडचिरोलीत प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्ह्यातील विकास कामांना गती देत त्या पूर्ण वेगाने पूढे...

दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार ‘गडचिरोलीसाठी’ महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या दिवशी 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार

✍️गडचिरोली दि.22 : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात गुंतवणूकिचा पहिला करार गडचिरोलीसाठी करण्यात...

Recent News

Most Popular

Recent Comments