Friday, May 16, 2025
Homeदेसाईगंज*गडचिरोली जिल्ह्यातील चार नामवंत व्यक्तींना "महाराष्ट्र रत्न" पुरस्काराने सन्मानित*

*गडचिरोली जिल्ह्यातील चार नामवंत व्यक्तींना “महाराष्ट्र रत्न” पुरस्काराने सन्मानित*

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

✍️ गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील चार नामवंत व्यक्तींना, त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “महाराष्ट्र रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दर्पण पत्रकार एवं संपादक फाऊंडेशन, रेल यात्री एकता मजदूर संघ आणि विश्व ह्यूमन राईट्स अँड इन्फॉर्मेशन राईट असोशियन यांच्या संयुक्त विद्यमाने, समृद्ध सीडीसीसी बँक वरोरा नाका, नागपूर रोड, चंद्रपूर येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यातील विविध भागांतील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, कलाकार आणि सेवाभावी संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहम्मद आरिफ पटेल – वरिष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते, यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून तळागाळातील जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी अथक परिश्रम घेतले. यांच्या कार्याची दखल घेऊन या सोहळ्याचे अवचीत्य साधून यांचा सत्कार करण्यात आलात्, तसेच अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या कार्याचा ज्यांनी ठसा उमटविला, झाडीपट्टी रंगभूमीवर आपल्या कलेद्वारे पंधरा व्यावसायिक नाट्य लेखन, दहा ऑडियो व्हिडिओ अल्बम, मोहतेल काव्य संग्रह, नाट्य दिग्दर्शक, नेपथ्यकार, टि. सिरीज, कलंकिनी मराठी मालिकेचे गीतकार, संगीतकार, झाडीपट्टी नाट्य निर्माता संघटनेचे सचिव, डिजिटल पत्रकार संघ गडचिरोली जिल्ह्याचे सहसचिव व प्रल्हाद नाट्य रंगभूमी देसाईगंज चे यशस्वी निर्माता, सर्वांना सुपरिचित असे कवी. प्रल्हाद मेश्राम यांना सुध्दा कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

सदर गुण गौरव सोहळ्यात समाज सेवेतील योगदानाबद्दल मेरी विल्सन यांचा, समाज सेविका म्हणून सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक कार्य व पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरी बद्धल, तिन्ही संघटनेकडून बाबू कुरेशी यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बाबू कुरेशी हे डिजिटल मिडिया पत्रकार संघटना गडचिरोली चे अध्यक्ष व निर्भिड पत्रकार म्हणून परिसरात परिचित आहेत.

या चारही व्यक्तींनी गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले असून, त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्यातील सामाजिक, कला व सांस्कृतिक पातळीवर सकारात्मक बदल घडून आले आहेत.

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

फौजदार अभिजीत काळे यांना गडचिरोली जिल्ह्यातील उल्लेखनिय कामगिरीसाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान

✍️ :पोलिस उपनिरीक्षक अभिजीत काळे यांना गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलातील उल्लेखनिय कामगिरी करुन बजाविलेल्या सेवेसाठी २०२४ या वर्षाकरीता 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान महाराष्ट्र दिनी...

सामान्य माणसाचे विकासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल – सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची महाराष्ट्र दिनी ग्वाही

गडचिरोली, (जिमाका) दि.01: 'सामान्य माणसाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल,' अशी...

Recent News

Most Popular

Recent Comments