Thursday, March 27, 2025
HomeUncategorizedआम्ही मोदी सरकार ला घाबरणार नाही

आम्ही मोदी सरकार ला घाबरणार नाही

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

काँग्रेसकडून देशभरात निर्देशने करण्यात येत आहेत. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही या निर्णयावरून मोदी सरकावर जोरदार टीका केली.

प्रियांका गांधी म्हणाल्या, भाजपचे (BJP) प्रवक्ते, नेते आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझा भाऊ, माझे आई-बाबा आणि पंडित नेहरुंवर खालच्या पातळीवर टीका करत असतात. मात्र, त्यांना आजपर्यंत कोणतीही शिक्षा झाली नाही. राहुल गांधी यांनी संसदेत गौतम अडाणींचा मुद्दा उपस्थित केला. सरकारला प्रश्न विचारले, म्हणून मानहानीच्या निमित्ताने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा, आरोप प्रियांका गांधी यांनी केला.

Assembly Session : राहुल गांधींच्या मुद्यावर विरोधक आक्रमक : विधानसभा अध्यक्ष कारवाईचा निर्णय घेत नसल्याने सभात्याग
एका वर्षापासून या प्रकरणाला स्थगिती दिलेली होती. याचिकाकर्त्यानेच हे प्रकरण स्थगित करण्याची मागणी केली होती. मात्र, संसदेत राहुल गांधी यांनी गौतम अदाणींच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला प्रश्न विचारले. त्यानंतर याचिकाकर्त्याने अचानक हे प्रकरण पुन्हा बाहेर काढले. मुळात मोदी सरकारला गौतम अडाणींच्या मुद्यावर उत्तर द्यायचेच नाही. त्यामुळे षडयंत्र रचून त्यांनी राहुल यांना संसदेच्या बाहेर काढले आहे, असेही प्रियांका गांधी म्हणाल्या.

Rahul Gandhi : राहुल गांधींवरील कारवाईची अमेरिकेतही दखल; भारतीय वंशांचे खासदार, पंतप्रधान मोदींना म्हणाले…
राहुल गांधी आणि काँग्रेस या विरोधात जोरदार लढा येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमच्या शरीरात शहिदांचे रक्त आहे. ते नेहमी आम्हाला परिवारवादी म्हणतात. मात्र, आमच्या परिवाराने या देशासाठी बलिदान दिले. आम्ही माघार घेणार नाही, आम्ही मोदी सरकारला घाबरणार नाही, असा इशारा प्रियांका गांधी यांनी दिला.

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

विकासकामांना पूर्ण वेगाने पूढे न्या – मुख्य सचिव सुजाता सौनिक दोन आठवड्याच्यावर विकासकामे प्रलंबित ठेवू नये शासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा

✍️गडचिरोली दि. 22: राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज गडचिरोलीत प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्ह्यातील विकास कामांना गती देत त्या पूर्ण वेगाने पूढे...

दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार ‘गडचिरोलीसाठी’ महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या दिवशी 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार

✍️गडचिरोली दि.22 : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात गुंतवणूकिचा पहिला करार गडचिरोलीसाठी करण्यात...

Recent News

Most Popular

Recent Comments