Tuesday, January 14, 2025
HomeUncategorizedगावाने घेतला टोकाचा निर्णय, दारू पिल्यास शासकिय योजनाचा लाभ मिळणार नाही

गावाने घेतला टोकाचा निर्णय, दारू पिल्यास शासकिय योजनाचा लाभ मिळणार नाही

नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील कंधार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

तालुक्यातील (Kandhar) पाताळगंगा या

ग्रामपंचायतीने ग्रामसभा (Grampanchayat gramsabha) आयोजित करुन व्यसनमुक्तीचा ठराव घेतला आहे. गावात दारू, सिगारेट, गुटखा, तंबाखू खाताना आढळल्यास कायदेशीर कारवाईचा इशार देण्यात आल्याने संपुर्ण नांदेड जिल्ह्यात गावाची मो चर्चा आहे. विशेष म्हणजे व्यसनमुक्तीचा निर्णय घेतल्यामुळे ग्रामस्थांचं कौतुक देखील करण्यात येत आहे. गावातील मुलं अधिक व्यसन करीत असल्यामुळे गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे
दोन हजार लोकसंख्येच्या गावात तरूणं मुल देखील व्यसन करत आहेत. व्यसनमुक्तीसाठी अनेकांनी प्रयत्न केले, मात्र कसल्याही प्रकारचा फरक पडला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या बैठकीत तसा ठराव करण्यात आला. पण असला ठराव ग्रामसभेतघेतल्याशिवाय पारित होणार नाही अशी कायदेशीर अडचण आली. त्यामुळे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी ग्रामस्थ चर्चा केली. येणारी पिढी बरबाद होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी होकार दिला. 20 जानेवारी रोजी ग्रामसभा झाली आणि सर्वानुमते हा ठराव पारित झाला .आता संपुर्ण गावात दारू पिण्यास बंदी आहे. दुकानात सिगारेट, बिडी, गुटखा, तंबाखुची विक्रीला बंदी, व्यसन करताना कोणी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचं ग्रामसभेत ठरलं आहे. त्यानुसार गुटखा विकल्यास अन्न औषध प्रशासनाला माहिती देऊन कारवाई केली जाणार आहे. दारू पिल्यास शासकि योजनाचा लाभ मिळणार नाही. हा निर्णय झाल्यानंतर अनेकांनी आपल व्यसनं सोडलंय. सुरुवातीला काही त्रास झाला पण आता काही वाटत नाही असं गावकरी म्हणत आहेत. गावातील तरूण पिढीसाठी हा निर्णय योग्य असल्याने आपण पण व्यसनाचा त्याग केल्याचे गावकरी सांगतात. सध्या या गावात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असून गाव जिल्ह्यात चर्चेत आलय.

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

48 नक्षलवाद्यांनी लॉयड्स मेटल्समध्ये काम करून नवीन मार्ग शोधला

✍️ गडचिरोली:  नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...

गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी गांधी चौकातून बाईक रॅली च्या माध्यमातून मुक मोर्चा काढला.

गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...

Recent News

Most Popular

Recent Comments