# satara# सातारा दि. 18: दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे व 15 ऑगस्ट रोजी तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी नागरिक व विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात छोट्या कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रम संपल्यानंतर फाटलेले, खराब झालेले राष्ट्रध्वज रस्त्यावर, कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले आढळतात त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होते. तरी नागरिक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखावा. तसेच खराब झालेले, फाटलेले राष्ट्रध्वज विद्यार्थी, युवक मंडळे, कीडा मंडळे,स्वयंसेवी संस्था यांच्या मतदीने गोळा करुन त्याची ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतुदीनुसार विल्हेवाट लावावी, असे तहसिलदार (सर्वसाधारण) यांनी कळविले आहे.
✍️ :पोलिस उपनिरीक्षक अभिजीत काळे यांना गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलातील उल्लेखनिय कामगिरी करुन बजाविलेल्या सेवेसाठी २०२४ या वर्षाकरीता 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान महाराष्ट्र दिनी...
गडचिरोली, (जिमाका) दि.01: 'सामान्य माणसाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल,' अशी...