Thursday, February 6, 2025
HomeUncategorizedमहाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज 5 मार्च पर्यंत सादर करावेत

महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज 5 मार्च पर्यंत सादर करावेत

✍️हिंगोली:दि. 24 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या दोन विभागातर्गत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमाशी सलग्न असणाऱ्या विद्यार्थ्याना निर्वाह भत्ता या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित,विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरुन आपल्या महाविद्यालयात त्याची हार्ड कॉपी जमा केलेली आहे. परंतु मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर अनुसूचित जाती प्रवर्गातील जवळपास 1101 शिष्यवृत्ती अर्ज व विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील जवळपास 896 शिष्यवृत्ती अर्ज अद्यापही महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. तसेच मागील वर्षाच्या तुलनेत अर्ज नोंदणीचे प्रमाणही कमी दिसून येत आहे. तसेच सहायक आयुक्त समाज कार्यालयामार्फत वेळोवेळी लेखी पत्राद्वारे, प्रेसनोटद्वारे व तोंडी सूचना देऊन अद्यापही महाविद्यालयाकडुन यावर कार्यवाही झालेली नाही,
ज्या महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत अशा महाविद्यालयांनी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज दि. 05 मार्च, 2023 पर्यंत तपासून पात्र असल्याची खात्री करुन तात्काळ सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, हिंगोली यांच्या स्तरावर फॉरवर्ड करावेत. एकही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील याची नोंद घ्यावी, असे शिवानंद मिनगीरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

विकासकामांना पूर्ण वेगाने पूढे न्या – मुख्य सचिव सुजाता सौनिक दोन आठवड्याच्यावर विकासकामे प्रलंबित ठेवू नये शासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा

✍️गडचिरोली दि. 22: राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज गडचिरोलीत प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्ह्यातील विकास कामांना गती देत त्या पूर्ण वेगाने पूढे...

दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार ‘गडचिरोलीसाठी’ महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या दिवशी 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार

✍️गडचिरोली दि.22 : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात गुंतवणूकिचा पहिला करार गडचिरोलीसाठी करण्यात...

Recent News

Most Popular

Recent Comments